आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच काल वर्षा बंगल्यावर शिवाजीराव आढळराव पाटलांसह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.
तर वर्षा बंगल्यावरून बाहेर पडतांना आढळराव पाटलांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. यातच असं राजकारण झालं तर मी राजकारणातून संन्यास घेऊन घरी बसणार असं अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहित पाटील यांनी म्हणत आढळराव पाटलांच्या पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटलांना अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेची उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा सुरू आहे. यावर अजित पवार गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांच्या विरोधात गेली २० वर्ष संघर्ष केला. तर असं राजकारण करण्यापेक्षा घरी बसणार. आढळराव पाटील राष्ट्रवादीत येतील, अशी नुसती चर्चा आहे.
स्वागत करण्याचा जर तरचा प्रश्न आहे. त्यामुळे २० वर्ष आम्ही त्यांच्याविरोधात संघर्ष केला आहे. त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा घरी बसू. राजकारण हे तत्वाकरता व्हावं. असेही ते म्हणाले.तसेच जर आयाराम गयारामाचं राजकारण झालं तर त्याला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे पक्ष त्यांचं स्वागत करेल परंतु. वैयक्तिक जीवनात काय निर्णय घ्यायचा तो मला अधिकार आहे. माझ्या आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला आहे. मग त्यांच्यासोबत काम करण्याचा अधिकार मला असून लोकांना विचारून तो घेणार. त्यांनी माझ्यासोबत २० वर्ष खालच्या पातळीवर जाऊन संघर्ष केला आहे. हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मग त्यांच्यासोबत राजकारण करण्यापेक्षा घरी बसणार. असा इशाराही त्यांनी दिला.