शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर घणाघात केला. लक्षा ठेवा, उशीजवळ साप ठेऊन झोप कधी येत नाही. पोलीस ठाण्यात काय झाले. पोलीस ठाण्यात याद्दा घेऊन कोण जात होते. हा आमच्या नाही याला अटक करा. हा आमचा आहे, त्याला सोडा, असे कोण सांगत होते. आमच्या कार्यकर्त्याचा सख्या बहिणेचे लग्न होते. परंतू त्याला जमीन मिळाले नाही लग्नात मी गेलो होतो. तेव्हा त्याचे वडील म्हणाले काय झाले.गोट्या आला नाही तर .. परंतू गोट्याच्या रूपात हा भास्कर आला आहे. पोलीस लाचर झाले , ते पोलीस राहिले नाही. केवळ नावालाच पोलीस आहे. पोलिसांनी त्या पदाला काळीमा लावली आहे. असा पोलिसांवर घणाघात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.
विक्रांत जाधव यांच्य भाषणावर बोलताना भास्कर जाधव यांना म्हटले की विक्रांतने चांगले विवेचन केले. माझे डोळे भरून आले. खरं तर मला हुंदके आले. पण मी स्वत:ला आवरले विक्रांत तू आक्रमक भाषण केले. परंतू तुझ्या भाषेचा दर्जा खालवला नाही.त्यामुळे मला भरूण आले मी स्वत:ही कधी व्यक्तीगत पातळीवर जाऊन भाषण केले. माझ्या भाषेत नेहमीच सभ्यता राहिल. विक्रांत तू ही ती प्रथा कायम ठेवली त्याबाबत मी जाहीरपणे कौतूक करतो.
काय म्हणाले होते विक्रांत जाधव
विक्रांत जाधव यावेळी मेळाव्यात बोलताना म्हणाले की, भास्कर जाधव इतके हलके नाही की कोणी धक्का लावल्यामुळे ते पडतील. त्यांनी भल्या लोकांना धक्का लावला आहे. कोणी आपल्याकडे येतो, काही सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो. तेव्हा आपण का गप्प बसतो. त्याच्या एखादा खालचा कार्यकर्ता तेव्हा आपण गप्प बसायला नको. त्यांनी उत्तर दिले पाहीजे