पुणे: आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा व कार्तिकी एकादशी उत्सवसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून यात्रींच्या सोयीसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातून पीएमपीला ९८ लाख ८७ हजार १२२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली, त्याचप्रमाणे या बससेवेचा एकूण ७ लाख ४० हजार ३१८ प्रवाशांनी लाभ घेतला असल्याचीही पीएमपी प्रशासनाने दिली.
आळंदी येथे दरवर्षी होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात.
त्यांना सोयीस्कर आणि सुलभ प्रवासासाठी पीएमपीकडून दरवर्षी अशा विशेष सेवा पुरवल्या जातात. यंदाच्या यशस्वी आयोजनामुळे पीएमपी प्रशासनाने भाविकांचे आभार मानले असून, भविष्यातही अधिक चांगल्या सुविधा देण्याची संकल्प प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पीएमपीकडून नोव्हेंबर महिन्यात दि. २४ ते २९ दरम्यान एकूण ३४३ बस सोडण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये ११४ नियमित बस आणि २२९ अतिरिक्त बसचा समावेश होता. तसेच या कालावधीत आवश्यकतेनुसार मध्यरात्री बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.