मुंबई : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवसेनेच्या मातृतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आज समारोप होत आहे. यानिमित्त सुषमा अंधारे आणि सर्व मुक्त संवादाचे सहभागी पदाधिकारी शिवतीर्थावर पोहोचले होते. शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून त्यांची मातोश्रीवर पञकार परिषद झाली. या पञकार परिषदेत बोलताना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला.
या वेळी उद्गव ठाकरे काय म्हणाले ?
सुषमाताई आणि त्यांची टीम शेवटच्या माणसापासून सुरू केले आहे. जे काही याञेतून बाहेर आले हे जनतेसमोर आलं पाहिजे. उद्योगपती शेतकरी कामगार सगळ्यांमध्ये असंतोष आहे. सरकार जाहिरातबाजी करते.५०००० घर दिल्याचा दावा करते ज्याने लोक भ्रमित होतात. सगळेच नाराज आहे. जनतेत गैरसमज पसरवला जोतोय असे उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.
तसेच एव्हीएमचा घोटोळा करून जिंकले तर जनतेत मोठा असंतोष निर्णाण होईल. चंदिगढमध्ये त्यांनी तेच केल. हिमाचलमध्ये देखील तेच केलं. काल भाजपने १९५ जणांची यादी जाहीर केली अमित शह आणि मोदीचं नावदेखील नव्हत. तेव्हापासून नितीन गडकारी यांचं नाव ऐकतोय पण त्यांच नाव यादीत नव्हत. ज्यांनी एवढी काम केली एक्सप्रेसवेचे काम केलं पण ज्यांच्यावर भ्रष्टाचारच आरोप केले त्यांची नाव आहेतय जुमलाचे नाव बदलून आता गॅरंटी झालं आहे अशी टीकाही उध्दव ठाकरे यांनी केली.
उपनेत्या सुषमा अंधारे काय म्हाणाल्या…
भारतातला सगळ्यात जास्त क्राईम रेट हा महाराष्ट्रात आहे. विद्यार्थ्यांना राज्यात नोकरी हवी आहे सगळ्या औषधाच्या कंपन्या गुजरातला गेल्या आहेत. माञ आपल्या मुलांना इथेच नोकरी करायची आहे.अनेक प्रश्र आहेत नाशिकमध्ये कांदा उत्पादकांना प्रश्र आहे. पोलीस यंञणेबद्दल लोक साशंक आहेत अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी या याञेमध्ये आलेले अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितले.