राज्यात आज इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना मोठ्या धाडसाने काही मुलं कॉपी पूरविण्यासाठी धडपड करीत होते. यामुळे कॉपीमुक्त परीक्षा या अभियानास पहिल्याच दिवशी हरताळ लागल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात होते. नंदुरबार जिल्ह्यातील 49 परीक्षा केंद्रातून 21 हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नोदणी केली आहे. आज परीक्षेचा पहिला दिवस होता. या परिक्षेसाठी बैठी आणि भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शाळा परिसराच्या बाहेरून कॉपी पुरवली जाऊ नये यासाठी विशेष पोलिसांचे पथक देखील तैनात करण्यात आले आहे. केंद्राच्या 200 मीटरच्या आतील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच 100 मीटरच्या आत पालकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दहावीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीदरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील एका शहरात विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नातेवाईकांची धडपड दिसून आली. या केंद्रावर कॉपी बहाद्दरांसाठी नातेवाईक भिंतीवर चढून खिडकीतून विद्यार्थ्यांना कागदाच्या चिठ्ठ्या देत आहे.