पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पंकजा मुंडे या अभियानाच्या निमित्ताने बीडच्या पौंडूळ गावात मुक्कामासाठी गेल्या आहेत. त्यांचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. यावेळी मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं.
तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला आज इथे कुंकू लावला, मला कडक लक्ष्मीचे रूप दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितलं. मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला. त्यांना चहा विकावा लागला. शाळेत त्यांना फी भरायला पैसे नव्हते, शाळेत जाताना त्यांना अनंत अडचणी आल्या”, असंदेखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
आपल्यासाठी 2014 ची निवडणूक दुर्दैवाने चांगली ठरली नाही. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर केवळ काही दिवसात ते आपल्यातून गेले. मी 2009 मध्ये राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या असे म्हणाले. बाबा यमराजा पुढे अपयशी ठरले. मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं सांगितलं. आपली जात केवळ वंचित आहे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे”, असं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं.
माझ्यावर केलेलं तुम्ही प्रेम आणि मोदी यांनी सांगितलेलं काम याची मला आज जोड मिळाली. आता कामे सुरू झाले असतील. मात्र अनेक विकासकामे माझ्या काळात मंजूर झाले आहेत. रामापेक्षा रावणाने राज्य जास्त केले. ज्याने आदर्श घालून दिला त्याच रामाचे नाव आपण घेतो. रामाला वनवास भोगावा लागला. मी आज माहेरसिन म्हणून इथ मुकामी आले आहे. ताईचं काय? म्हणून मला सर्व लोक विचारतात. मुंडे साहेब गेल्यानंतर मला लोक ताईसाहेब म्हणतात. माझ्यात लोक मुंडे साहेबांना बघतात म्हणून राज्यभर मला ताईसाहेब म्हणतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.