भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने बाजी मारत 3 -1 अशी आघाडी घेतली आहे.भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडचा 5 विकेट्सनी पराभव भारताचा हा मायदेशातला सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे. चौथ्या कसोटीत आर. अश्विन, आकाश दीप, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी दमदार कामगिरी केली.
इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 307 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडला 145 धावात गुंडाळले. विजयासाठी 192 धावांचे आव्हान मिळाल्यावर हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार करत सामना आणि मालिका खिशात टाकली.संघात नवख्या खेळाडूंचा भरणा होता. तरी देखील रोहितने संघाचे नेतृत्व यशस्वीरित्या करत इंग्लंडचा बॅझबॉल मोडून खाल्ला. भारताने चौथ्या कसोटीत नाणेफेक गमावून देखील सामना जिंकून दाखवला.या सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. संधीचं सोनं कसं करावं हे यशस्वी, सर्फराज , शुभमन गिल, ध्रुव जुरेल आणि आकाश दीपकडून शिकावंं!
भारताने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बिनबाद 40 धावांपासून सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने ही भागीदारी 84 धावांपर्यंत पोहचवली. रोहित अर्धशतक ठोकले. मात्र 37 धावांवर रूटने यशस्वीला बाद केलं.
त्यानंतर भारताची गळती सुरू झाली. रोहित शर्मा 55 धावा करून बाद झाला अन् त्यानंतर आलेला रजत पाटीदार शुन्य धावांची भर घालून परतला. भारताची अवस्था 3 बाद 100 धावा अशी झाली असताना शुभमन गिल आणि रविंद्र जडेजाने 20 धावांची भागीदारी रचली.मात्र लंचनंतर इंग्लंडने पुन्हा भारताला दोन धक्के दिले. बशीरने जडेजाला 4 धावांवर तर सर्फराज खानला शुन्यावर बाद करत भारताची अवस्था 5 बाद 120 धावा अशी केली.भारताकडून यशस्वी जैस्वाल (73) आणि ध्रुव जुरेल (90) यांनी धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 145 धावांवर आटोपला आणि भारतासमोर हे लक्ष्य ठेवण्यात आले. भारतीय संघाने आजचा हा सामना जिंकला तर ती मालिका 3-1 ने जिंकेल.