राष्ट्रवादीच्या “आधारावडा”ला विश्व हिंदू परिषदेच्या “वटवृक्षा”ने खोडा घातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपल्यासाठी वटवृक्ष हे चिन्ह मागितल्याची बातमी समोर येताच विश्व हिंदू परिषदेने वटवृक्ष हे चिन्ह गेल्या 60 वर्षांपासून आमचे आहे.
ते कुठल्याही राजकीय पक्षाला देऊ नये. तसे दिल्यास समाज मनात संभ्रम निर्माण होईल, अशा आशयाचा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नाव आणि चिन्ह घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला सोपविल्यानंतर शरद पवारांच्या गटाला आयोगाने “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार” असे नाव दिले. परंतु, अद्याप चिन्ह दिलेले नाही. शरद पवारांच्या गटाने वटवृक्षाचे चिन्ह आपल्या पक्षाला मिळावे, अशी मागणी निवडणूक आयोगाने केल्याची बातमी आहे.पवार गटाने वटवृक्ष चिन्ह निवडण्यामागे शरद पवारांचे समर्थक त्यांना “आधारवड” असे संबोधतात.
पवारांसारख्या वयोवृद्ध नेत्याचा सगळ्यांनाच आधारावडासारखा आधार आहे, असे ते मानतात. त्यामुळे वटवृक्ष हे चिन्ह पक्षाला मिळाल्यास त्याचा समाज मनावर सकारात्मक परिणाम होण्याची शरद पवार गटाला आशा आहे.