मुंबई: चक्क दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे… आभाळच फाटले आहे कुठे कुठे ठिगळं लावणार?
मुंबई ते नागपूर ७०० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या शिंदे – फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा केला, जाहिरात भाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन ही करण्यात आले. बारा तासात मुंबईहून नागपूरला पोचणार असा दावा करणाऱ्या महामार्गाचेच बारा वाजल्या चा चित्र दिसून येत आहे. समृद्धी महामार्ग सुरुवात पासूनच वादग्रस्त ठरला आहे सातत्याने होत असलेल्या अपघाताचा प्रश्न असताना आता या महामार्गावरील एका पुलाला मोठा खड्डा पडला आहे पुलावरील खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह तर निर्माण झालाच आहे पण पुलावर पडलेला हा केवळ खड्डा नसून ‘समृद्धी’ला शिंदे – फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे पडलेले हे भगदाड आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव जवळच्या फुलाला खड्डा पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. उद्या १४ महिन्यातच पुलावर भला मोठा खड्डा पडल्याने या रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे समृद्धी महामार्गाच्या आराखड्यात व बांधकामात त्रुटी असल्याचा तक्रारी करण्यात येत होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. नागपूर – मुंबई समृद्धी हा ५५ हजार कोटी रुपयांचा महामार्ग सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे.
महामार्गासाठी जमीन संपादन करताना मोठा भ्रष्टा झाला तसेच या मार्गाच्या तांत्रिक बाबींमध्येही गडबड आहे. समृद्धी महामार्गाच्या आराखड्यासाठी तंत्रज्ञानाचा विशेष पथकाला हजारो कोटी रुपये दिले पण अपघाताचे प्रमाण पाहता रस्ते बांधणी करताना फारशी काळजी घेतल्याचे दिसत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि एक्सप्रेस वे साठी निश्चित केलेले नियम पाळले नाही. रोड हिप्नाॅसीसमुळे अपघात होतात असे काही तज्ञांनी सांगितले आहे त्याच्यावर काही उपाय केले नाहीत. रस्त्यावर ठराविक अंतरावर चहापाणी, हॉटेल आणि स्वच्छतागृह उपलब्ध नाही त्यात आता रस्त्याला भगदाड पडल्याने या महामार्गाने कोणाची समृद्धी केली हे दिसत आहे, असा टोलाही पटोले यांनी मारला आहे.