स्मार्टफोनच्या किमतीबाबत भारतात सतत चर्चा होत असते. यामागे अनेक कारणे आहेत. अनेकवेळा सरकारच्या निर्णयामुळे स्मार्टफोनच्या किमती कमी होतील, अशी अटकळ बांधली जात आहे तर कधी त्यामुळे स्मार्टफोनच्या किंमतीही वाढतात.
पण बजेटच्या एक दिवस आधी सरकारने स्मार्टफोन इंडस्ट्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
स्मार्टफोन पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये स्मार्टफोनचे बॅटरी कव्हर, प्लास्टिक आणि धातूचा समावेश आहे. त्यावर, आयात शुल्क 5% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे स्मार्टफोनच्या किमतीतही मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंबहुना, सरकार स्मार्टफोनबाबतही मेड इन इंडियावर भर देत आहे.
यापूर्वी स्मार्टफोन पार्ट्सवर 15 टक्के आयात शुल्क होते, मात्र ते 10 टक्के करण्यात आले आहे. कमी कर म्हणजे स्मार्टफोनची किंमतही कमी होईल. चीन, मेक्सिको, व्हिएतनाम आणि थायलंडशिवाय भारतात आयात शुल्क सर्वाधिक आहे. यामुळे ॲपल आयफोनची किंमतही खूप वाढली आहे.भारतात आयफोनची मागणी खूप जास्त आहे. यामुळेच सरकार भारतात आपले उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी आग्रही आहे. सॅमसंग आपल्या नोएडा प्लांटमध्ये लॅपटॉप देखील तयार करेल.
म्हणजेच आता सॅमसंगकडून मेड इन इंडिया लॅपटॉप दिले जाणार आहेत. अशा परिस्थितीत भारतात बनलेल्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपची बाजारपेठ खूप मोठी होईल. यामुळे युजर्ससाठी ही मोठी बातमी असू शकते. सॅमसंगच्या या निर्णयामुळे लॅपटॉपच्या किमतीत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. याआधी, डेलने भारतात उत्पादन प्रकल्प उभारला होता.












