जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती.
या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर जालना जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचं निलंबन करण्याची मागणी जोर धरू लागली होती. वाढत विरोध पाहता दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
आता या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. गृह विभागाने सोमावारी सायंकाळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.












