काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. आज छत्तीसगड सभा घेतली या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबाबत नवा वाद सुरू केला आहे. पंतप्रधान मोदींचा जन्म ओबीसी वर्गात झाला नसल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.
त्यांचा जन्म गुजरातमधील तेली जातीत झाला. २००० साली भाजपने या समाजाला ओबीसीचा टॅग दिला होता. त्यांचा जन्म सर्वसामान्य जातीत झाला. केंद्रातील भाजप सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की ते (पीएम मोदी) कधीही जात जनगणना होऊ देणार नाहीत कारण त्यांचा जन्म ओबीसीमध्ये झाला नाही, त्यांचा जन्म सर्वसामान्य जातीत झाला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या जातीमुळे लोकांना फसवले जात आहे. काँग्रेस नेते म्हणाले की मला माहित आहे कारण पंतप्रधान मोदी गरीब, शेतकरी आणि मागासवर्गीय लोकांचा हात कधीच धरत नाहीत. त्यांनी फक्त अदानींचा हात धरला आहे. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी जात जनगणना आणि सामाजिक न्याय यावर बोललो तेव्हा पीएम मोदी म्हणाले – देशात फक्त दोनच जाती आहेत – श्रीमंत आणि गरीब. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा वादंग उठण्याचे संकेत आहे.












